Posts

Showing posts from January, 2018

नागाच्या पिलाला तू का ग खवळल...!!!

Image
वाह ....काय उच्च विचार आहेत मा.मुख्यमंत्र्याचे... शेतकऱ्याचं मी पोर... नको तुझ्या जीवाला घोर... आम्हांस माहीत आहे तुमच्या फासाचा दोर... आहोत आम्ही स्वतः खंबीर....!!!                गाढवालासुद्धा ताप येण्यासारखे विचार मांडून आपल्या अतिउच्चकोटी बुद्धी कौशल्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा केलंय....शेतकऱ्यांच्या मुलांनी वडिलोपार्जित शेतीत राबायचं अन तुमच्या सारख्या घुबडानी येऊन त्यांना लुटायचा, हाच उद्देश आहे तुमचा...पेशव्यांनी ज्या पद्धतीने सामान्य जनतेच्या पिळवणूक करून समाजातल्या दिन दुबळ्या लोकांना हीन वागणूक दिली, त्याच पद्धतीने तुम्ही सध्या आम्हाला वागणूक देण्याचा प्रयत्न करत आहेत...पडद्याआड तुमच्या कोणत्या भूमिका असतात ते आता समोरासमोर जनतेला दिसतंय, इंग्रजी राजवटीत जनता खुश होती अशी म्हणायची वेळ आली, पण हे आता शक्य नाही, कारण आम्ही सध्या जरी बेरोजगार असलो तरी तुमच्या सारखी बुद्धी गहाण ठेवून काम करत नाही....                मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही तर महाराष्ट्रचे पालक आहात, पालकांची आपल्या कुटूंबप्रती काय जबाबदारी असते ते सुद्धा माहीत नाही, जाऊ देत तुम्हाला तुमच्या घरची मंडळी सा

आयुष्याला द्यावे उत्तर...

Image
                आज नवीन वर्षीची सुरुवात, सर्वांनी नवीन वर्षात नवनवे संकल्प केले असतील, कुणी डायरी आणून दिनक्रम लिहिणे, सकाळी गणपतीच्या पाया पडून दिवसाची तयारी, जिम लावणे, इत्यादी. ३६५ दिवसाची संपूर्णपणे गोळाबेरीज केली असेल पण उद्याचं काय विचारलं तर समोर प्रश्नचिन्ह उभे राहत.एकएक दिवसांचा विचार करत वर्ष कधी सरून जात ते कळत सुध्दा नाही म्हणून आजचा दिवस कसा आनंदी घालवता येईल हाच फक्त विचार केला तर त्या दिवशी तुम्ही उत्तरदायी असाल. आयुष्य म्हणजे काय..? प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना विचार आहेत पण आयुष्य जगत असताना कोणत्या पद्धतीने जगावं हे मराठी कवी विंदा करंदीकर यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून अतिशय सुरेख पध्दतीने मांडले आहे, ती कविता मला खूप आवडली म्हणूनच आपल्या बरोबर ती शेअर करतोय. आपल्या आयुष्याच्या संकल्पनाची परिपूर्ती करण्यासाठी हे फारच गुणकारी औषध आहे असं मला वाटतं. आयुष्याच्या बुद्धीपटलावरती स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने आपल्या विचाराची निर्मिती करतो, कशाची भीती बाळगून आपले सामर्थ्य कमी करतो, इच्छा असते पण मार्ग म