Posts

Showing posts from 2017

बाबांन लेकी साठी लिहलेली कविता...

Image
एका बाबानं लेकीसाठी लिहिलेली कविता. बाबानेही वाचावी अन लेकीनेही! गोड माझी परी! देवाच्या घरून एव्हढ्या दुरून आली माझ्या घरी, गोड माझी परी हृदयाचे स्पंदन ती, रेशमाचे बंधन ती, प्रेमाची भाषा ती, जगण्याची आशा ती पाणावले डोळे आज, पापण्यांच्या तिरी आली माझ्या घरी गोड माझी परी... बोबल्या बोलांनी, निनादले घर पावलांच्या गुंत्यात, जीव खालीवर घोडा करून बाबाचा, स्वारी खूष पाठीवरी आली माझ्या घरी गोड माझी परी... शाळेत पहिला दिवस तिचा काळजीनं बाबाचा जीव वेडापिसा हुरहूर मनाला जरी , टाटा ती करी आली माझ्या घरी गोड माझी परी... ए बाबा तू कुठे आहेस? तू ये ना घरी लवकर अस तिचं फोनवरचं लाडिक मधाळ बोलणं, बाबाला घायाळ करी फोन करून ती घेई काळजाचा ठाव मग बाबाच्या मनाची होई धावाधाव आईपेक्षा बाबावर लळा ती करी आली माझ्या घरी गोड माझी परी... हळू हळू वाढे ही चंद्राची कोरं नटण्या मुरडण्याची हौस तिला भारी हट्ट पुरवे बाबा तिचा अपुल्या परी आली माझ्या घरी गोड माझी परी... हळू हळू दिवस गेले भुर्र उडून स्थळ आलं तिला कुणा आप्ताकडून काळजात झाल चर्र , पिल्लू जाईल आता दुसऱ्या घरी आली माझ्या

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी....!!!!

Image
            " यत्र नार्यस्तु पुज्यते! रमन्ते तत्र देवता !"   अशी नारी पुजनाची महती संस्कृत सुभाषितकाराने गायिली आहे. या जगात फक्त दोनच जाती आहेत ती म्हणजे एक पुरुष, दुसरी स्त्री. नारीचे(स्त्री)  पूजनीय स्थान सांगत असताना 'न स्त्री स्वातंत्रमहर्ती...!! असे म्हणून तिच्या स्वातंत्र्याची किल्ली मात्र पुरुषांच्या हातांत देऊन टाकली आहे.                        "तुच माता तुच सरस्वती,                         तुच कालिका, तुच रणरागिणी,                         तुच या विश्वाची वसुंधरा,                         तुच सखी नि तुच दामिनी,                         तु इंदिरा, तू झाशी,                         तु जिजाऊ तु सावित्रीबाई,                        तु प्रतिमा, तु कल्पना,                        तु आदिशक्ती, तु संयमाचा महामेरू"               अशा एक ना अनेक प्रकारे स्त्रीची विविध रूप समोर येतात, आपण त्यास पाहतो; पण आज हे प्रत्येक स्त्रीला उपभोगता आलं का ? ती स्वतः तिचं रक्षण करण्याचे कार्य करू शकते का ? स्त्री वंदनीय आहे, पुज्यनिय आहे म्हणून ती रक्षणीय आहे. पण रक्ष

शिक्षणव्यवस्था ते शिक्षणमहर्षी...

Image
                  लेखन- प्रविण बाजीराव साळुंखे कर्मवीर जयंती निमित्त ... आजच्या लेखाची सुरुवात गीतकार कवी विठ्ठल वाघ यांच्या रयतगीताने करावीशी वाटते याला कारणही तसेच आहे की आजची शिक्षण व्यवस्थेतील बदललेल्या वळणाची अवस्थेची गाथा याला यतकिंचितही स्पर्शून जात नाही याची जाणीव होते... रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.  वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ || कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे.  शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे.  धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे.  रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ || गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई.  कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई.  स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे.  रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २|| दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया  अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया.  शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे.  रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३|| जीवनातला तिमिर जावा,

चार शब्दांचा संच रेशमाचा.....

Image
                                        श्री.प्रविण.बी. साळुंखे               हल्लीच्या मॉडर्न युगात म्हणजे आधुनिकतेने भरलेल्या जगात व्हाट्सअँप, फेसबुक यासारखी अनेक लोकप्रिय माध्यमे म्हणजे आपण त्यांस आपल्या कुटुंबातील एक सदस्य याप्रमाणे ही समाजमाध्यमे वापरतो. कालच्या ओघात जुन्या सेवेचा वापरही कमी-कमी होऊ लागला.त्यात आपल्या भारतीय टपाल सेवेचे योगदान उल्लेखनीयअसूनही आपण त्यास विसरून चाललो आहे. एकेकाळी दुरदूरपर्यंत संदेश पोहचवण्यासाठी हिचाच आधार घेतला जायचा. पण ठीक आहे , काळाप्रमाणे आपणास आपली वेळ ही बदलायला हवी आणि आपण ती बदललीही..परंतु विसरून मात्र चालणार नाही.              आता कोणत्याही सण वार उत्सव जयंती वाढदिवस पुण्यतिथी आशा एक ना अनेक सणासाठी आपण शुभेच्छा देण्यासाठी डिजिटल समाजमाध्यमे वापरत असतो, आपली दिवसाची सुरुवातच सकाळच्या गुड मॉर्निंग मेसेज ने होते , तिकडे तो अंथरुणातून न उठताच इकडे दुसर्यांना शुभेच्छा देण्यास उतावळा असतो. इथं भावनांना प्राधान्य दिलं जात नाही, त्यामुळे आपल्याला कधी कधी या गोष्टींचा राग येतो. कोणत्याही संदेशाची पुरेपूर माहिती नसतानाही ती दुसर्यांना पाठवण्यास